उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला सर्वांत जास्त आनंद आहे की अटल सेतूचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं. याचे भूमिपूजनही मोदींनी केलं होतं. या देशात मोदीराज आला म्हणून अटल सेतू पूर्ण होऊ शकला. मोदीराज आला नसता तर अटल सेतू होऊच शकला नाही. अटल सेतूची १९७३ मध्ये संकल्पना मांडली होती. १९८२ मध्ये जेआरडी टाटा कमिटनीने अलाईन्टमेंट केली. परंतु, ४० वर्षांत काहीच झालं नाही. मोदी पंतप्रधान बनले तसा देशाचा मिजास बदलला, काम करण्याची पद्धती बदलल्या आणि मग अनेक गोष्टी वेगाने चालू लागल्या.